ग्रामीण आवास योजनांमध्ये धामणसे आणि कोतवडे ग्रामपंचायतींना मिळाला प्रथम क्रमांक

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या श्रेणीत धामणसे ग्रामपंचायतीने प्रथम, तर चवे आणि गोळप या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा पुरस्कार मिळवला. राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेत कोतवडे ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला, तर गावखडी आणि निरुळ या ग्रामपंचायतींना दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला.

पहिल्या वाढदिवसाला जमले २०० जण; उत्सवमूर्ती होतं कदंबाचं झाड

रत्नागिरी : मुलांचे, मोठ्या माणसांचे किंवा अगदी पाळीव प्राण्यांचेही वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरे केले जातात, यात काही नवीन नाही; पण रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावात बुधवारी (१६ जुलै) ग्रामस्थ आणि विद्यार्थी अशा सुमारे दोनशे जणांनी एकत्र येऊन एक अनोखा वाढदिवस उत्साहात साजरा केला. उत्सवमूर्ती होतं कदंबाचं झाड. या एका वेगळ्याच उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे.