वड्याचे तेल वांग्यावर

प्रशिक्षणाकरिता निघालेल्या शिक्षकांच्या वाहनाला अपघात झाला. प्रशिक्षणाकरिता नेमून दिलेले नियम शिक्षकांना आक्षेपार्ह वाटतात. प्रत्येक सत्रानंतर हजेरी घेणे, पाच मिनिटे विलंब झाला तरी गैरहजेरी लावणे, प्रत्येक सत्रानंतर चाचणी घेणे शिक्षक संघटनांना आक्षेपार्ह वाटते. प्रशिक्षणाला वेळेवर पोहोचण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. मात्र ही पळवाट आहे. प्रशिक्षणाचे नियम कडक करायला शिक्षकांच्या वर्तनानेच प्रशासनाला भाग पाडले असले पाहिजे, हेही संघटनांनी लक्षात घ्यायला हवे. प्रशिक्षणाबद्दलची नाराजी व्यक्त करताना वड्याचे तेल वांग्यावर काढून काय उपयोग?

निवळी घाटात अपघात; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई-गोवा महामार्गावर आज (आठ जून) सकाळी रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटात बावनदीच्या जवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.