कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प होणार नाहीत; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ‘लोकांच्या आरोग्याला घातक असलेलं कोणतंही काम सरकार करणार नाही. प्रदूषणकारी प्रकल्पांना कोकणात आळा घातला जाईल.’

पत्रकारांच्या प्रश्नांवर कार्यशाळेचा उतारा

महाराष्ट्र राज्य माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे रत्नागिरीत दोन दिवसांची पत्रकार कार्यशाळा महासंचालक, संचालक या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. दीर्घ कालावधीनंतर पत्रकारांसाठी महासंचालनालयाने आयोजित केलेली कार्यशाळा उत्तमरीत्या पार पडली. दोन दिवसांच्या कार्यशाळेत मांडता येण्यासारखे विषय मांडले गेले. पत्रकारांचे प्रबोधन झाले. नवी माहिती मिळाली. मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना रत्नागिरी जिल्ह्याची सैर त्या निमित्ताने झाली. रत्नागिरीतील अलीकडच्या काळातील विकासकामे त्यांना आवर्जून दाखविली गेली. उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेल्या या कार्यशाळेने पत्रकारांच्या बाबतीत मात्र अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवले. किंबहुना पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देण्याकरिता कार्यशाळेचा उतारा देण्यात आला.

मुंबईतून तीन तासांत रत्नागिरी आणि साडेचार तासांत सिंधुदुर्गात आणणाऱ्या रो रो जलसेवेचा लवकरच प्रारंभ; क्रूझ किनारपट्टीवर दाखल

रत्नागिरी : ‘रस्ता, रेल्वेसोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार प्रयत्नशील असून, त्याचाच भाग म्हणून लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होतानाच नवा अध्याय राज्यात सुरू होईल,’ अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी दिली.

कोकणात गटशेती होण्याची गरज : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरीत प्रतिपादन

‘कोकणात भरपूर क्षमता आहे. कोकणातलं शेतीक्षेत्र छोटं आहे. म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांना गटशेतीकडे वळवलं पाहिजे. त्यातून शेतीमालाचा ब्रँड तयार होतो आणि विपणन सोपं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे. शेतकरी अन्नदाता आहे. त्याला कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. तरच शेतकरी समृद्ध होईल. इथे उदरनिर्वाह होत नाही म्हणून इथला तरुण बाहेर जातो. त्याला रोजगार इथेच मिळाला पाहिजे, असं नियोजन केलं पाहिजे,’ असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं.