माझी वसुंधरा अभियान

प्रत्येकाने आपापल्या पातळीवर पर्यावरणाच्या रक्षणाचा प्रयत्न करायला हवा. शहरे आणि ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यात आलेले माझी वसुंधरा अभियान त्यासाठी उपयुक्त आहे. मात्र त्यातील उपक्रम केवळ अभियानाच्या आणि स्पर्धेच्या वर्षापुरते राबवून काहीही उपयोग नाही. या उपक्रमांचे महत्त्व पटले असेल तर हे उपक्रम दैनंदिन जीवनाचाच एक भाग झाले पाहिजे. तरच अभियान राबविण्यात काही अर्थ आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल खात्याने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील आठ हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्ड्स आणि माहितीपुस्तिका पोस्टाकडून प्रकाशित

महाराष्ट्रातील वारसा असलेल्या आठ बारव अर्थात हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिका पोस्टाने प्रकाशित केली आहे.

आता सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल : धीरज वाटेकर

चिपळूण : दिवसेंदिवस मनुष्य अधिकाधिक वृक्षतोड करतो आहे. मनुष्याने वृक्षतोड करू नये, वृक्षसंवर्धन करावे यासाठी आपल्याला सर्वांना वृक्षरक्षक बनावे लागेल, असा कानमंत्र लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कोकणला पर्यटन नियामक प्राधिकरण हवे : धीरज वाटेकर

खेड : कोकणच्या प्राकृतिक सौंदर्याची कठोर काळजी घेणाऱ्या पर्यटन नियामक प्राधिकरणाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.

प्लास्टिकबाबत प्रशासनाची उदासीनता

रत्नागिरीसह सर्वत्र सर्वसामान्यांच्या नजरेला दिसणारा प्लास्टिकचा कचरा त्याच रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणारे मंत्री, आमदार, त्यांच्या पाठीमागून फिरणारे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामपंचायतीपर्यंतच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसत नाही. त्याचे काही करावे, असे त्यांना वाटत नाही. प्रसारमाध्यमे आणि जाहीर कार्यक्रमात प्लास्टिकविरोधातील घोषणा दिल्या, की त्यांचे काम संपले!