मुंबई : बुधवारी (दि. २२ मार्च) जागतिक जलदिन आणि गुढी पाडवा आहे. त्यानिमत्ताने मुलुंड (मुंबई) येथे जलबोध केंद्राचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
Tag: पाणीवाले परांजपे
जलवर्धिनीच्या पर्जन्य जलसाठवण उपक्रमाची सुरेश प्रभूंकडून दखल
रत्नागिरी : मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने गेल्या काही वर्षांपासून कोकणासह विविध ठिकाणी राबविलेल्या पावसाचे पाणी साठवण्याच्या उपक्रमाची माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेतली आहे. हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
पावसाचे पाणी साठविण्यासाठी जलवर्धिनीचा मदतीचा हात
रत्नागिरी : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या जलशक्ती अभियानाला आणि राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या जलजागृती उपक्रमाला प्रतिसाद म्हणून मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने फेरोसिमेंटच्या जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी बांधकाम साहित्य तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कर्जत येथे २३ नोव्हेंबरला जल माहिती केंद्र मार्गदर्शन
कर्जत (जि. रायगड) : कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने जल माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राचाच प्रारंभ येत्या मंगळवारी (दि. २३ नोव्हेंबर) माऊली सभागृह (शिवाजीनगर, दहिवली-कर्जत) येथे होणार आहे.
‘फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानाने मंडणगड तालुक्यात प्रथमच पर्जन्यजल साठवण
मंडणगड : ‘फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानाने मंडणगड तालुक्यात कुंबळे गावात प्रथमच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग टॅँक’ बांधण्यात आली असून त्यासाठी मुंबईच्या जलवर्धिनी प्रतिष्ठानने साह्य केले आहे.
पावसाचे पाणी साठवण्याच्या किफायतशीर तंत्रांची माहिती ‘ई-बुक्स’मध्ये; पाणीवाले परांजपे यांचे लेखन
कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी काही प्रमाणात जरी साठवता आले, तरी कोकणातील काही गावांत मे महिन्याच्या अखेरीला जाणवत असलेली पाणीटंचाई दूर होऊ शकेल. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उल्हास मुकुंद परांजपे गेली १२-१५ वर्षे झटत आहेत. स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ अशा पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे तंत्र त्यांनी अनुभवातून सिद्ध केले आहे. या तंत्रांची माहिती देणारी त्यांची पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले-बुक्सवर प्रकाशित झाली आहेत.