अतिवृष्टीमुळे महापूर आला हे खरेच, पण त्याच पावसाचे पाणी साठवून महापुरामुळे महाड शहरात घराघरांत झालेला चिखल स्वच्छ करायला मदत झाली. महापुराला पाऊस कारणीभूत असला, तरी पावसाचे पाणी साठविल्यास किती उपयुक्त ठरू शकते, याचेच हे उदाहरण आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
अतिवृष्टीमुळे महापूर आला हे खरेच, पण त्याच पावसाचे पाणी साठवून महापुरामुळे महाड शहरात घराघरांत झालेला चिखल स्वच्छ करायला मदत झाली. महापुराला पाऊस कारणीभूत असला, तरी पावसाचे पाणी साठविल्यास किती उपयुक्त ठरू शकते, याचेच हे उदाहरण आहे.
मंडणगड : ‘फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानाने मंडणगड तालुक्यात कुंबळे गावात प्रथमच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग टॅँक’ बांधण्यात आली असून त्यासाठी मुंबईच्या जलवर्धिनी प्रतिष्ठानने साह्य केले आहे.
कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी काही प्रमाणात जरी साठवता आले, तरी कोकणातील काही गावांत मे महिन्याच्या अखेरीला जाणवत असलेली पाणीटंचाई दूर होऊ शकेल. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उल्हास मुकुंद परांजपे गेली १२-१५ वर्षे झटत आहेत. स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ अशा पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे तंत्र त्यांनी अनुभवातून सिद्ध केले आहे. या तंत्रांची माहिती देणारी त्यांची पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले-बुक्सवर प्रकाशित झाली आहेत.