‘दहावी-बारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. आजची कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी आहे. आता शिक्षणाच्या शाखा विस्तारल्या असून, तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडू शकता येईल. जे क्षेत्र निवडाल त्यातील परिपूर्ण ज्ञान घ्या. दहावी-बारावीचे शिखर शेवटचे नसून, आता खऱ्या अर्थाने नवे प्रवेशद्वार उघडले आहे,’ असे प्रतिपादन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले.
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावीतील गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.