बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र; महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांच्या गाड्या रोखल्या

रत्नागिरी : बारसू (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र झाले आहे. या रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण आज (२५ एप्रिल २०२३) आंदोलक महिलांनी रोखले. पोलिसांच्या गाड्यांचा ताफा महिलांनी रस्त्यावर झोपून अडवला. दरम्यान, प्रशासनाकडून लवकरच बारसू रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण थांबवावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प नकोतच, मुंबईतील मेळाव्यातील मागणी

मुंबई : चौपदरीकरण सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे लेखापरीक्षण व्हावे आणि कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नयेत, अशी मागणी कोकणवासीयांचा मेळाव्यात करण्यात आली.

शनिवारी मुंबईत जनता दलातर्फे कोकणवासीयांचा मेळावा

मुंबई : रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न तसेच कोकणच्या विकासाची दिशा याविषयी चर्चा करण्यासाठी येत्या शनिवारी (दि. ११ मार्च) जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जन विकास समितीने मुंबईत कोकणवासीयांचा मेळावा आयोजित केला आहे.