चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘समर्थ रंगभूमी, रत्नागिरी’ या संस्थेच्या ‘अग्निपंख’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘वीरशैव समाज, लांजा’ या संस्थेच्या ‘इठ्ठला’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.