रत्नागिरीतील शेतकऱ्यांना भात, नाचणीच्या सुधारित जातींचे बियाणे मिळणार मोफत; मुदत दोन दिवस

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात (२०२५) भात आणि नाचणीच्या सुधारित जातींचे बियाणे मोफत देण्यात येणार आहे. फक्त त्यासाठी शेतकऱ्यांना ३० मेपर्यंत आपल्या गावातील कृषी सहायक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हा नियोजन निधीमधून यासाठीचा खर्च केला जाणार आहे.

पाऊस लवकर आला; पण पेरणीची घाई नको; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

यंदा रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यामध्ये अभूतपूर्व प्रमाणात पाऊस पडला आहे; मात्र शेतकऱ्यांनी भात आणि नाचणीच्या पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. एरव्ही पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होते. त्यामुळे पेरणीचा हंगाम गेलेला नसून, यापुढे चार-पाच दिवस पाऊस थांबून ऊन पडल्यावर भातपेरणी करणे सोयीचे ठरेल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधण्याकरिता जलवर्धिनी प्रतिष्ठान करणार मदत

मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने फेरोसिमेंटच्या जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान कोकणातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी काही साहित्य, तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी दिली.

अक्षय्यतृतीयेपासून दिल्लीत हापूस आंबा महोत्सव; कोकण मेव्याचेही खास आकर्षण

मुंबई : कोकणच्या सुपीक मातीतून पिकत असलेल्या, जगभर प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचा सुगंध आता थेट दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये दरवळणार आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकारातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत पहिल्यांदाच ३० एप्रिलपासून दोन दिवसांच्या हापूस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन हजार डझन रत्नागिरी हापूस आंबे लंडनच्या बाजारात

यंदाच्या गुढीपाडव्याला युरोपीयांना, तसेच तेथील मराठी माणसांनाही रत्नागिरी आणि देवगड येथील हापूस आंबे उपलब्ध होणार आहेत. २५ आणि २६ मार्च रोजी रत्नागिरी हापूस आंब्यांच्या पहिल्या दोन बॅचेसमधून दोन हजार डझन आंबे लंडनला रवाना झाले आहेत.

रत्नागिरीतील शास्त्रज्ञाचे हिंदी पुस्तक करणार देशभरातील मत्स्य उत्पादकांना मार्गदर्शन

रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी यांनी आतापर्यंत असंख्य मत्स्योत्पादकांना मार्गदर्शन केले असून, त्यासाठी पुस्तकेही लिहिली आहेत. आता त्यांनी ‘मीठे जल में मछलीपालन’ हे समग्र माहिती देणारे हिंदी पुस्तक लिहिले असून, त्याचा उपयोग देशभरातील मत्स्योत्पादकांना होणार आहे.