रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात (२०२५) भात आणि नाचणीच्या सुधारित जातींचे बियाणे मोफत देण्यात येणार आहे. फक्त त्यासाठी शेतकऱ्यांना ३० मेपर्यंत आपल्या गावातील कृषी सहायक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हा नियोजन निधीमधून यासाठीचा खर्च केला जाणार आहे.