गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३मध्ये केवळ १२ ते १५ टक्के आंबा उत्पादन; राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी : उदय सामंत

रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (१२ एप्रिल २०२३) आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.

एकात्मिक शेती प्रभाग प्रकल्पातील रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या कार्यालयाचे कोतवड्यात उद्घाटन

कोतवडे (ता. जि. रत्नागिरी) येथे जिल्ह्यातील पहिल्या एकात्मिक शेती प्रभाग प्रकल्प (Integrated Farming Cluster) कार्यालयाचे उद्घाटन १९ जुलै २०२२ रोजी झाले.

‘टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी हवी; पण शेतकरीहितासाठी सध्याचे नियम जाचक’

वाइन उत्पादनाचे नियम आणि निकष केवळ बड्या उद्योजकांना अनुकूल ठरतील असेच आहेत. केवळ द्राक्षांपासूनच नव्हे, तर अनेक फळांपासून वाइन करता येते. वाइननिर्मितीची ही प्रक्रिया कोणताही छोटा शेतकरी किंवा उत्पादक घरच्या घरी करू शकतो; मात्र सरकारचे सध्याचे नियम त्याला तशी परवानगी देत नाहीत, असा दावा या विषयात अनेक यशस्वी प्रयोग केलेले दापोलीतील उद्योजक माधव महाजन यांनी केला आहे. वाइन म्हणजे दारू नव्हे, तर ते पोषणमूल्य असलेले पेय असल्याने अगदी चहा टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी मिळायला हवी, असेही त्यांचे म्हणणे आहे.

मंडणगड पंचायत समितीचा पाच एकर हळद लागवडीचा पथदर्शक प्रकल्प

पाच एकर क्षेत्रावर ४० हजार हळद रोपांची लागवड करण्याचा नावीन्यपूर्ण पथदर्शक प्रकल्प आकाराला येत आहे. इतर तालुक्यांसाठीही तो आदर्शवत आहे.

पालघरच्या किनारपट्टीवर कलहंसाचा मुक्त विहार

पालघर (नीता चौरे) : वातावरणातील वेगाने होणारे बदल आणि कमीजास्त प्रमाणात पडणारी थंडी अशी स्थिती असूनही पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक परदेशी पक्षी वास्तव्याला आले आहेत. त्यापैकी कलहंस नावाच्या पक्ष्याचा विहार पाहायला अनेक पक्षीप्रेमी आणि पर्यटक पालघरच्या किनारपट्टीवर येऊ लागले आहेत.

भात, नाचणीच्या कापणीनंतर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती

पालघर : मिनी महाबळेश्वर हे नाव सत्यात उतरवण्यासाठी जव्हार-मोखाड्यातील शेतकरी पुढे सरसावले आहेत. पारंपरिक भातशेती आणि नाचणी शेतीला बगल देत किंवा भात आणि नाचणीच्या कापणीनंतर तेथील शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना उत्तम उत्पन्न मिळत आहे.