रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक लोककलांचे अस्सल संगमेश्वरी बोलीत विनोदी ढंगाने सादरीकरण करून अवघ्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या समर्थकृपा प्रॉडक्शन निर्मित लोकनाट्याने ५०० प्रयोगांचा टप्पा पार केला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक लोककलांचे अस्सल संगमेश्वरी बोलीत विनोदी ढंगाने सादरीकरण करून अवघ्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या समर्थकृपा प्रॉडक्शन निर्मित लोकनाट्याने ५०० प्रयोगांचा टप्पा पार केला.
बोलीभाषांच्या अस्तित्वाबद्दल चिंतेचे सूर ऐकू येत असताना एखाद्या बोलीभाषेतील लोकनाट्याचे तब्बल ५०० प्रयोग होणे हा एक विक्रमच आहे. हे भाग्य कोकणातील संगमेश्वरी बोलीला लाभलं असून, ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हे त्या विक्रमी लोकनाट्याचं नाव आहे. अस्सल स्थानिक कलाकृती संस्कृतिवाहक कशी ठरू शकते आणि बोलीभाषेच्या पुनरुज्जीवनालाही कसा हातभार लावू शकते, हे या लोकनाट्याच्या उदाहरणावरून दिसतं. २३ मार्च २०२५ रोजी अडूर (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) इथे या लोकनाट्याचा ५००वा प्रयोग होत आहे. त्या निमित्ताने…
रत्नागिरी : जे वापरात नाही ते गंजते. याप्रमाणे जे शब्द वापरले जात नाहीत ते कालौघात मागे पडतात आणि शब्दसंपदेतला तारा निखळत जातो. भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे. शब्दांचा वारसा आपल्याला घरातून मिळतो, पण आज अंगाई गाणाऱ्या आयाच आपल्याकडे नाहीत, अशी खंत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे गुरुवारपासून (दि. ५ ऑक्टोबर) बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
रत्नागिरी : वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल, अशा संगमेश्वरी बोलीतील खणखणीत शब्दांत या वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा लोककलाकार सचिन काळे यांनी मांडली.