मास्क नसेल, तर पोलीसही ठोठावू शकतील ५०० रुपयांचा दंड

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक संचारबंदीबाबत तूर्त कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र येत्या सात-आठ दिवसांमध्ये सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे अशी आवश्यक ती खबरदारी लोकांनी घेतली, तर संचारबंदीची वेळ येणार नाही. ती येऊ नये यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीत स्वॅब टेस्ट लॅब उभारण्याचा शासन निर्णय जारी; करोनाग्रस्तांमध्ये आज पाचने वाढ

रत्नागिरी : मिरज येथून आज (२५ मे) रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६१वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५५ रुग्णांना उपचारांनंतर पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करायला मान्यता देणारा शासन निर्णय राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज (२५ मे) जारी केला.

रत्नागिरीत सहा जण करोनामुक्त; सिंधुदुर्गात आठ नवे रुग्ण; रत्नागिरीत १५ दिवसांत स्वॅब टेस्टिंग लॅब होणार

रत्नागिरी : रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज (२३ मे) सहा रुग्णांना उपचारांनंतर करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले. तसेच, आज मिरजमधून आलेले ११५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज रुग्णांमध्ये नवी वाढ झालेली नाही. रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात करोनाच्या निदानासाठी स्वॅब टेस्टिंग लॅब येत्या १५ दिवसांत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तिचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ मे) आठ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.