उशिरा सुचलेले शहाणपण

मोठे आंदोलन उभे राहिल्यानंतर प्रशासनाला आता स्थानिक ग्रामस्थांशी समन्वय साधण्याचा उपाय सुचला आहे. पण ही पश्‍चात बुद्धी म्हणता येईल. स्थानिक ग्रामस्थांना केवळ गृहीत धरले जाते. त्यांना समजून सांगण्याची आणि त्यांना समजावून घेण्याची भूमिका प्रशासन कधीच घेत नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासन धडपडत आहे, पण एकदा प्रशासनाच्या विरोधात मत झाले की ते पुन्हा प्रशासनाच्या बाजूने व्हायला खूप काळ जावा लागेल. त्यात वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी आपापल्या राजकीय सोयीनुसार विविध मतमतांतरे प्रकट करत असतात.

Continue reading

पत्रकारांना हाकलण्याचा उद्दामपणा

आपल्यावरील अन्यायाविरुद्ध पत्रकार रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची शक्यता नाही आणि त्यांनी तसे ते केले तरी ते केवळ प्रतीकात्मक असेल. नेत्यांप्रमाणे त्यांच्या पाठीशी लोकांचा जमाव नसतो. पण तरीही लोकमत जागवण्याचे, नवी मते निर्माण करण्याचे काम माध्यमेच करू शकतात. दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकमत तयार करण्याचे कामही ही माध्यमे करू शकतात, याची जाणीव प्रशासनाने ठेवायला हवी. लोकप्रतिनिधी संभ्रम निर्माण करतात, माध्यमे समन्वय निर्माण करू शकतात. त्यांच्याशी प्रशासनाने समन्वयानेच वागायला हवे. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मुळावर येऊ शकतो.

Continue reading

दिशा मिळाली, लक्ष्य कोठे?

शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते तर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. विविध व्यासपीठांवरून त्याचाच उल्लेख केला जात आहे. याचाच अर्थ भाजपाला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. खासदारपद शिवसेनेचेच आहे, असेही ठामपणे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे.

Continue reading

ॲड. दीपक पटवर्धन सहकार क्षेत्रात राज्याला दीपस्तंभ : अतुल काळसेकर

रत्नागिरी : ॲड. दीपक पटवर्धन महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी दीपस्तंभ आहेत, असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी काढले.

Continue reading

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नव्या युगाचे सर्वस्पर्शी अंदाजपत्रक

हे. पुढील पंचवीस वर्षांचा आराखडा नजरेसमोर ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे.

Continue reading

राज्यातील सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती – नीलेश राणे

रत्नागिरी : राज्यातील सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे. डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारक अजून होत नाहीत. जनतेलाही हे आता समजले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बळावर सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष बनवू, असा निर्धार भाजपचे नवनियुक्त प्रदेश चिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला.

Continue reading

1 2