रत्नागिरी : जनता करोनाच्या महामारीने हैराण झाली आहे. त्यातच, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या अधिकारात प्रशासक नेमणे, ही बाब म्हणजे राजकीय पोळी भाजून घेण्याचा आघाडी सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. याला रत्नागिरी जिल्ह्यातून भारतीय जनता पक्ष कडक विरोध करणार आहे. कुणाचीही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी दिला.