महामार्ग, पाणी, विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने काम करण्याची नारायण राणेंची ग्वाही

‘महामार्ग, पिण्याचं पाणी, रत्नागिरी विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने मी काम करणार आहे. खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. लोकांना अपेक्षित असलेलं काम मी करू शकेन, असा मला विश्वास वाटतो. लोकांनी विश्वास ठेवला, तो मी सार्थकी लावीन. जवळपास ३९ वर्षांनी इथे भाजपचा खासदार निवडून आला आहे, याचा आनंद आहे. आता आम्ही त्यात सातत्य ठेवू,’ असं प्रतिपादन विद्यमान केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं.

खेडशी गावाने नववर्षदिनी केले विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, एक जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले.

विकसित भारत संकल्प यात्रेचे रत्नागिरी शहरात उत्साहात स्वागत

विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.

फेरबदलासह राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवार अर्थमंत्री, तर वळसे-पाटील सहकारमंत्री

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

साहित्य चळवळीला चालना

कोकणात साहित्य चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली आहे. अनेक साहित्यिक कोकणाने घडवले आहेत. विविध साहित्यिक संस्था, संघटना कोकणात पूर्वीपासून काम करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेपाठोपाठ मराठी साहित्य परिषदेच्याही अनेक शाखा कोकणात ठिकठिकाणी स्थापन झाल्या आहेत. त्यात आता अखिल भारतीय साहित्य परिषद या देशपातळीवरील साहित्य संस्थेची भर पडणार आहे. कोकणातील साहित्य चळवळीला देशपातळीवर स्थान देऊ शकणाऱ्या या संस्थेचे स्वागत करायला हवे.

उशिरा सुचलेले शहाणपण

मोठे आंदोलन उभे राहिल्यानंतर प्रशासनाला आता स्थानिक ग्रामस्थांशी समन्वय साधण्याचा उपाय सुचला आहे. पण ही पश्‍चात बुद्धी म्हणता येईल. स्थानिक ग्रामस्थांना केवळ गृहीत धरले जाते. त्यांना समजून सांगण्याची आणि त्यांना समजावून घेण्याची भूमिका प्रशासन कधीच घेत नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासन धडपडत आहे, पण एकदा प्रशासनाच्या विरोधात मत झाले की ते पुन्हा प्रशासनाच्या बाजूने व्हायला खूप काळ जावा लागेल. त्यात वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी आपापल्या राजकीय सोयीनुसार विविध मतमतांतरे प्रकट करत असतात.