रत्नागिरी : ‘ऑडिट करणे हे अर्थकारणातील अत्यंत महत्त्वाचे काम असून, ते केवळ चार्टर्ड अकाउंटंट्सना करता येते. या प्रोफेशनकडे समाजात चांगल्या दृष्टीने पाहिले जाते. तसेच, या क्षेत्रात नैतिक मूल्ये काटेकोरपणे पाळली जातात. त्यामुळेच सीए होणे हे अन्य क्षेत्रांपेक्षा वेगळे, मानाचे आणि तितक्याच जबाबदारीने करण्याचे काम आहे. जास्तीत जास्त नागरिक अर्थविषयक कायद्यांनुसार वागावेत, यासाठी सीए मोठी भूमिका निभावू शकतात,’ असे प्रतिपादन रत्नागिरीतील प्रसिद्ध सीए वैभव देवधर यांनी केले.