रत्नागिरी : करोना विषाणूचा ओमिक्रॉन हा उत्क्रांत प्रकार अतिशय झपाट्याने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी आणि याचा जिल्ह्यात शिरकाव होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.