रत्नागिरी : करोनाच्या बेरोजगारीच्या काळात देवरूख आणि रत्नागिरीतील काही तरुणांनी आपले ज्ञान, शिक्षण किंवा सामाजिक चौकटीची तमा न बाळगता वेगळ्या वाटेने जाऊन रोजगार शोधला आहे. त्यातील काही तरुण इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत, तर काही जण पौरोहित्य करणारेही आहेत. सध्याच्या काळाची गरज ओळखून त्यांनी घरोघरी वस्तू आणि विविध प्रकारचा माल पोहोचविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
