करोनाच्या काळात वस्तू घरपोच पोहोचवण्याचा व्यवसाय; देवरूख, रत्नागिरीच्या तरुणांचा उपक्रम

रत्नागिरी : करोनाच्या बेरोजगारीच्या काळात देवरूख आणि रत्नागिरीतील काही तरुणांनी आपले ज्ञान, शिक्षण किंवा सामाजिक चौकटीची तमा न बाळगता वेगळ्या वाटेने जाऊन रोजगार शोधला आहे. त्यातील काही तरुण इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत, तर काही जण पौरोहित्य करणारेही आहेत. सध्याच्या काळाची गरज ओळखून त्यांनी घरोघरी वस्तू आणि विविध प्रकारचा माल पोहोचविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये खाद्यपदार्थांच्या होम डिलिव्हरीला परवानगी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोना प्रतिबंधासाठी आठ जुलैपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आलेले आहे; मात्र घरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, तसेच नोकरीनिमित्ताने एकटे राहावे लागणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये, यासाठी लॉकडाउनच्या आदेशामध्ये जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी थोडा बदल केला आहे.

Continue reading

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

रत्नागिरी : करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू मिळणाऱ्या दुकानात गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ग्राहकांना त्या वस्तू घरपोच देण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत.

Continue reading