अखेर आज (१० मे) दुपारी पाकिस्तानला उपरती झाली आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी भारताच्या ‘डीजीएमओं’ना फोन करून चर्चा केली. त्या चर्चेत असे ठरवण्यात आले, की दोन्ही देशांकडून सर्व प्रकारची (जमीन, हवाई आणि सागरी) लष्करी कारवाई आज सायंकाळी (१० मे ) पाच वाजल्यापासून थांबवण्यात येईल.