रत्नागिरी : येथील नारायणी मंडळाच्या प्रमुख सौ. विशाखा मोहन भिडे यांनी कीर्तन क्षेत्रातील कीर्तनालंकार ही पदवी उत्तम गुणांनी प्राप्त केली. ही पदवी मिळवणाऱ्या रत्नागिरीतील त्या पहिल्या महिला असून त्यानिमित्ताने नारायणी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.