वंदे भारत एक्स्प्रेस गुरांना धडकून झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक साडेतीन तासांनी सुरळीत झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
वंदे भारत एक्स्प्रेस गुरांना धडकून झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक साडेतीन तासांनी सुरळीत झाली.
गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या मुंबई आणि परिसरातील चाकरमान्यांकरिता मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून यंदा दोन मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.
मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात येणार असलेली कोकण रेल्वेची रो-रो सेवा कोकणवासीयांसाठी अत्यंत अव्यवहार्य ठरणार आहे. कोकणातील अनेक प्रवाशांच्या दृष्टीने सध्या चालवण्यात येणाऱ्या प्रवासी गाड्या कोकणवासीयांपेक्षा दक्षिणेकडे जाणाऱ्या राज्यातील प्रवाशांसाठी सोडल्या जातात, असा आरोप केला जातो. कारण जलद आणि अतिजलद गाड्यांचे खूपच कमी थांबे कोकणातील स्थानकांवर आहेत. त्याच पद्धतीने मोटारींची वाहतूक करणारी ही रो-रो सेवासुद्धा कोकणवासीयांसाठी कोणत्याही दृष्टीने व्यवहार्य ठरण्याची शक्यता नाही.
रत्नागिरी : एमआयडीसीला लागून असलेल्या कोकणातील रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी येत्या महिन्याभरात सामंजस्य करार केला जाईल. जगातील चांगली रेल्वेस्थानके कोकणात तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करू या, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वातानुकूलित आलिशान प्रतीक्षा कक्षाचे (एसी एक्झिक्युटिव्ह लाउंज) उद्घाटन आज (२९ मार्च) संध्याकाळी त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
रत्नागिरी : रत्नागिरीसह कोकणातील फळे आणि मत्स्योत्पादने जगभरात निर्यात होतात. त्या दृष्टीने कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूक यंत्रणा तयार केली आहे. त्यामुळे आता निर्यातक्षम माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात पाठवता येणार आहे.
रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे लोकार्पण आज (दि. ९ ऑक्टोबर) सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्याच कार्यक्रमातून जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या अन्य रेल्वेस्थानकांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.