जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन एक जुलैपासून आठ दिवसांच्या कडक लॉकडाउनची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र लॉकडाउनची अंमलबजावणी काटेकोरपणाने सुरू झाली. पहिल्या दोन्ही दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातले सर्वच व्यवहार बंद होते.