… आणि मान्सूनने एका दिवसातच गाठला केरळमधून महाराष्ट्राचा पल्ला

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीला गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे; मात्र त्यामुळे तयार झालेल्या अनुकूल वातावरणामुळे मान्सून चक्क १३-१४ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आज, २५ मे २०२५ रोजी मान्सून तळकोकणात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

नैर्ऋत्य मान्सून दक्षिण अंदमानात दाखल!

नैर्ऋत्य मोसमी पावसाने दक्षिण अंदमानचा समुद्र व्यापला असल्याची माहिती आज (१३ मे २०२५) भारतीय हवामान खात्याने जाहीर केली.

खूशखबर! मान्सून अंदमानात दाखल; २७ मे रोजी केरळमध्ये येणार!

नवी दिल्ली : यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात तापमानाने नवे उच्चांक गाठलेले असताना सर्वांना प्रतीक्षा आहे ती मान्सूनची. आणि तो अखेर अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच १६ मे २०२२ रोजी नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात येऊन दाखल झाले आहेत. २७ मे रोजी मान्सून केरळला थडकणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

रत्नागिरीत १८ दिवसांत वार्षिक सरासरीच्या १८ टक्क्यांहून अधिक पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एकूण वार्षिक सरासरीच्या १८ टक्क्यांहून अधिक पाऊस अवघ्या १८ दिवसांत पडला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११२.७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १९० मिमी पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला सरासरी ३३५५ मिमी पाऊस पडतो. एक जून ते १८ जून २०२० या कालावधीत १८.४२ टक्के पाऊस झाला आहे.