सावरकरांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेचे : राज्यपाल कोश्यारी

रत्नागिरी : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतातील जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (२५ ऑक्टोबर) केले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेतर्फे (आयसीएचआर) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सावरकर राष्ट्रीय स्मारकाची अभ्यासकांसाठी पर्वणी

स्वा. सावरकरांशी संबंधित समकालीन देशी-परदेशी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधील वृत्ते-लेखांचा संग्रह करण्याचा प्रकल्प स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे साकारला जाणार आहे. अभ्यासकांसाठी ती पर्वणीच ठरणार आहे.