रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात अक्षय्य तृतीयेदिनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात अक्षय्य तृतीयेदिनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण आणि ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तारपावादनाची पारंपरिक लोककला जपणारे पालघरमधील आदिवासी भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी धिंडा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कथामाला कार्यकर्ते आणि मालवण साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा केंद्रीय बालसेवा पुरस्कार बेळगाव येथे सपत्नीक प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी : कोकणाविषयी अनेक सकारात्मक विषय समाजमाध्यमांतून येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यूट्युबर सुशील कुलकर्णी यांनी केले
रत्नागिरी : हिंदू ही एक जीवन पद्धती आहे. हिंदू संस्कृती समावेशक, अद्वितीय आहे. ती जागतिक असून व्यक्ती व कुटुंब आणि विश्व, समाजाच्या हिताची आहे, असे प्रतिपादन लेखिका, भारतीय स्त्रीशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सहसंघटन सचिव सौ. नयना लिमये- सहस्रबुद्धे यांनी केले.
रत्नागिरी : के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे मराठीतील आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ५ व ६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.