रत्नागिरी : कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि सुपारी बागायतदारांचा मेळावा रावारी (ता लांजा) येथे झाला. त्यातून सुपारी बागेचे व्यवस्थापन आणि उत्पादनात होणारी घट थांबविण्याच्या दृष्टीने व्यापक विचारमंथन झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि सुपारी बागायतदारांचा मेळावा रावारी (ता लांजा) येथे झाला. त्यातून सुपारी बागेचे व्यवस्थापन आणि उत्पादनात होणारी घट थांबविण्याच्या दृष्टीने व्यापक विचारमंथन झाले.
राजापूर : एसटीने आंब्याची वाहतूक सुरू केल्याचा फायदा रायपाटण (ता. राजापूर) येथील शेतकरी समूहाला झाला. मालवाहतुकीच्या एकाच ट्रकमधून साडेतीन टन म्हणजे एक हजार डझन हापूस आंबा सोमवारी (ता. २५ मे) थेट औरंगाबादला रवाना झाला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने करोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. २३ मे रोजी कोकणातील हापूस आंब्यांच्या १५० पेट्या घेऊन एसटीचा पहिला ट्रक बोरीवलीकडे रवाना झाला. दरम्यान, रत्नागिरीतून आज (२४ मे) मुंबईला आणि उद्या (२५ मे) पुण्याला एसटीचा मालट्रक आंबे घेऊन जाणार आहे.