मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची सर्व प्रक्रिया येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज (तीन सप्टेंबर) मुंबईत राजभवनात झालेल्या सर्व कुलगुरूंच्या बैठकीतील निर्णयाची माहिती त्यांनी दिली.
