महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढल्यामुळे देशाची उत्पादनघट कमी होण्यास मदत

मुंबई : देशाच्या सागरी मत्स्योत्पादनात २०२४मध्ये दोन टक्के घट झाली आहे; मात्र महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. राज्याचे मत्स्योत्पादन वाढल्यामुळे देशाच्या मत्स्योत्पादनातील घट कमी होण्यास हातभार लागला आहे.

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा; राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय

मुंबई : राज्यात मत्स्यव्यवसायाला आजपासून (२२ एप्रिल २०२५) कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचा राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना फायदा होणार आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे मत्स्यशेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध

मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे माशांच्या शेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध असून, येत्या आठ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या या निविदा संधीचा लाभ कोकणातील उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन कोकणभूमी प्रतिष्ठानच्या कोकण बिझनेस फोरमतर्फे करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत भाग घेण्याचे माजी आमदार बाळ माने यांचे आवाहन

लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजेच ‘अनलॉक ४’च्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने आज (२९ ऑगस्ट) रात्री जाहीर केल्या. त्यानुसार, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्वीपेक्षा अधिक कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र कंटेन्मेंट झोनमधील कडक निर्बंध सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरूच राहतील, असेही त्यात म्हटले आहे.

सिंधुदुर्गातील मच्छिमारांना सागरी सुरक्षेबद्दल ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : भारतीय तटरक्षक दल-रत्नागिरी, मत्स्य व्यवसाय विभाग-सिंधुदुर्ग आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना सागरी सुरक्षेच्या दृष्टीने घावयाच्या काळजीबाबतची माहिती ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आली.