रत्नागिरी : रत्नागिरीतील लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करण्याची मागणी हिंदू जनजागरण समिती आणि इतर समविचारी संघटनांनी केली आहे. त्याकरिता आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती रत्नागिरीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.