तसं पाहायला गेलं, तर हा प्रसंग खूप मोठा आहे असं नाही; पण आजच्या काळात सर्व प्रकारच्या अस्मिता टोकदार झाल्यामुळे द्वेषाची उदाहरणं अनेक ठिकाणी दिसत असताना संवेदनशीलता जागृत असेल, तर जगाला प्रेम अर्पण करण्याच्या धर्माचा विसर पडणार नाही, याची जाणीव यातून होते, एवढं मात्र नक्की.
