रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील जन्मस्थानाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन १४ एप्रिल २०२३ रोजी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभीकरणासाठी शासनाकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
