मुळात ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वरूपातच साखळी तयार झालेली नाही. त्यामुळे त्यासाठी नेमके काय करावे लागते, याची माहिती उत्पादकांना नसते. त्यामुळे राज्य आणि देशपातळीवरही उत्पादने पोहोचू शकत नाहीत. अशा स्थितीत जागतिक पातळीपर्यंत ती कशी पोहोचणार, हा प्रश्नच आहे. दुबईतील मीटच्या निमित्ताने गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने, तसेच त्यांच्याकरिता प्रयत्न करणाऱ्या स्थानिक उद्योजकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
