रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. राजापूर तालुक्याला काल (१३ जून) संध्याकाळनंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. हवामान विभागाच्या नोंदीनुसार सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजापूर तालुक्यात ११९.८७ मिलिमीटर पाऊस झाला. राजापूर तालुक्यातल्या आडिवऱ्याच्या प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या आवारात पाणी शिरलं.