पाण्याखाली गेलेल्या चांदेराईतल्या ७७ दुकानांना प्रत्येकी ५० हजारांची मदत पालकमंत्र्यांकडून जाहीर

काजळी नदीचे पाणी वाढल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठ दोन दिवस पाण्याखाली होती. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी (२९ जुलै) चांदेराईला भेट दिली आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तिथल्या ७७ दुकानदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तर टपरीधारकांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना गुरुवारीही सुट्टी

रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्याप्रमाणेच उद्या (दि. २७ जुलै) जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना शनिवारीही सुट्टी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी येत्या २५ तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी, २२ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना गुरुवारी सुट्टी

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरुवारी (दि. २० जुलै) जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.