पाच-सहा पिढ्यांनंतर मराठीचे अस्तित्व धोक्यात -डॉ. सच्चिदानंद शेवडे

रत्नागिरी : इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे आणि पाश्चिमात्य चुकीच्या पायंड्यांमुळे पाच-सहा पिढ्यानंतर मराठीचे अस्तित्व धोक्यात येईल. त्याला आपणच जबाबदार असू, त्यामुळे आपणही सर्वांनी मराठी बोलू, वाचू, मराठीचा अभिमान बाळगू या, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

माणूस समजून घेण्यासाठी वाचनाला पर्याय नाही : अॅड. विलास कुवळेकर

लांजा (जि. रत्नागिरी) : सगळ्या समाजाला सर्वांत जास्त गरज आहे ती माणसांची आणि माणूस कसे व्हावे, हे जाणून घ्यायचे असेल आणि तो संस्कार आपल्यामध्ये रुजवून घ्यायचा असेल, तर पुस्तके वाचण्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी केले.

पाश्चात्य विद्वानांना गीता अर्थासह पाठ; आपल्याकडे मात्र उपेक्षा : धनंजय चितळे

‘झोंपाळ्यावरची गीता’ या मराठी ओवीरूप पुस्तकाच्या राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे गीता जयंतीच्या औचित्याने तीन डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरीत प्रकाशन झाले. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, व्याख्याते-प्रवचनकार धनंजय चितळे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गीता जयंतीदिनी ‘झोंपाळ्यावरची गीता’च्या इंग्रजी अनुवादाचे रत्नागिरीत प्रकाशन; कोकण मीडियाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरणही होणार

रत्नागिरी : येत्या शनिवारी, तीन डिसेंबर २०२२ रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीत The Geeta in Leisure या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन होणार आहे. १९१७ साली कवी अनंततनय यांनी लिहिलेल्या ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केला आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. तसेच, साप्ताहिक कोकण मीडियाने २०२२च्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर घेतलेल्या लेख आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही या वेळी होणार आहे.

रत्नागिरीत विश्व संवाद केंद्रातर्फे नागरी पत्रकारिता कार्यशाळा

रत्नागिरी : मुंबईतील विश्व संवाद केंद्रातर्फे आज महाविद्यालयीन व व्यावसायिक तरुण-तरुणी यांच्याकरिता झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात नागरी पत्रकारिता कार्यशाळा झाली.