रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिसरे मोठे क्षितिज उन्हाळी शिबिर आयोजित केले आहे. येत्या ११ ते १३ मे या कालावधीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या डोर्ले (ता. लांजा) येथे हे शिबिर होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिसरे मोठे क्षितिज उन्हाळी शिबिर आयोजित केले आहे. येत्या ११ ते १३ मे या कालावधीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या डोर्ले (ता. लांजा) येथे हे शिबिर होणार आहे.
दापोली : पैसे देऊन विष विकत घेऊन आजाराला बळी पडण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. नैसर्गिक शेती केली पाहिजे, असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
रत्नागिरी : व्यवसाय करायचे ठरविल्यानंतर अवघ्या एका महिन्यात बुकगंगाचा व्यवसाय सुरू केला. काहीतरी वेगळे करायचे विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक ठरविले, तर त्यात यश येऊ शकते, असा कानमंत्र बुकगंगाचे व्यवस्थापकीय संचालक मंदार जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
नागपूर : राष्ट्रं सर्वोपरी या विचारधारेवर चालणारी अभाविप ही जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेचा जगभरात विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगनभाई पटेल यांनी दिली.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या रत्नागिरी तालुकाध्यक्ष ग्रामीण विभाग अध्यक्षपदी खेडशी गावच्या पोलीस पाटील श्रीमती शलाका सावंतदेसाई यांची निवड झाली आहे. तालुकाध्यक्षपदी निवड होणाऱ्या श्रीमती सावंतदेसाई या पहिल्या महिला आहेत.
रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहासष्टावे राष्ट्रीय अधिवेशन यावर्षी नागपूर येथे येत्या २५ आणि २६ डिसेंबर रोजी होणार असून त्यामध्ये रत्नागिरी विभागातील २०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यापैकी ७ प्रतिनिधी दोन्ही दिवसांच्या अधिवेशनात आभासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अभाविपतर्फे रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.