रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले समुद्रात

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यातील सर्वाधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरून १ लाख ८६ हजार ५९६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ हजार २७७ पिल्लांचा समावेश आहे.

वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासव जन्मोत्सवाची चाहूल

मंडणगड : वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनारी १५ नोव्हेंबर रोजी कासवमित्र देवेंद्र पाटील यांना वाळूमध्ये ऑलिव्ह रिडले सागरी कासवाचे या हंगामातील पहिले घरटे आढळले. त्यामुळे कासवाच्या जन्मोत्सवाची चाहूल लागली आहे. दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी वेळास येथील कासवमित्रांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

वेत्ये समुद्रकिनाऱ्यावर यावर्षी सर्वप्रथम उमटणार कासवांची पाउले

राजापूर : ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे आज वेत्ये (ता. राजापूर) येथे कासवाची ६१ अंडी आढळून आली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात या किनाऱ्यावर जिल्ह्यात सर्वप्रथम कासवांची पावले उमटणार आहेत.

दरवर्षीचे सागरी पाहुणे यावर्षी आलेच नाहीत….

रत्नागिरी : वर्षअखेरीला कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेक पर्यटक पाहुणे येतात. पण यावर्षी त्यातले काही पाहुणे आलेच नाहीत.