बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची गरज : कुमार केतकर

‘कोकणासह मुंबईही पूर्णपणे बदलली आहे. मूळच्या कोकणातील लेखकांनी निर्माण केलेले साहित्य कोकणाचे चित्रण करणारे होते. आजकाल वास्तवाशी संबंध असलेल्या साहित्याची निर्मिती होत नाही. बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची आज गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी केले.

कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारीपासून ग्रामीण साहित्य संमेलन

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या ३० जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रिंगणे (ता. लांजा) येथे होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे माजी संपादक, माजी खासदार कुमार केतकर भूषवणार आहेत.

तीस जानेवारीपासून रिंगणे येथे अकरावे ग्रामीण साहित्य संमेलन

रत्नागिरी : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि रिंगणे, कोंडगे, कुरंग, झर्ये, आरगाव, झर्ये ग्रामस्थांनी आयोजित केलेले अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रिंगणे (ता. लांजा) येथे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या काळात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या मदतीसाठी बाजीप्रभू नाटकाचे चार प्रयोग

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या (मुंबई) मदतीकरिता वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकाचे चार खेळ रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत.

नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा : शिपोशी (ता. लांजा) येथे भरलेल्या नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या संमेलनात झालेल्या विविधरंगी कार्यक्रमांना रसिकांनी चांगली दाद दिली.

नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी शिपोशी गाव सज्ज

लांजा : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) आणि शिपोशी ग्रुप ग्रामपंचायत (ता. लांजा) यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असलेल्या नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाकरिता शिपोशी गाव सज्ज झाले आहे.