चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; मदतपथके तैनात

चिपळूण : हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या इशाऱ्यानुसार मुसळधार वृष्टी सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. १९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या स्थितीनुसार, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरातील नाईक कंपनी/मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी एक फूट पाणी भरलेले आहे.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा बँकेचे अल्प दरात कर्ज की पाच टक्के दराने?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त, व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक आणि वाहनधारकांना अल्प दरात कर्जपुरवठा करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा बँक पाच टक्के दराने कर्जपुरवठा करणार असल्याचे काल जाहीर केले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना अल्प दरात कर्ज मिळणार की, पाच टक्के दराने, याचा खुलासा होऊ शकला नाही.

हाहाकाराची भीषण उंची गाठणारा चिपळूणचा महापूर

चिपळूण : चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पुराचा वेढा दरवर्षीच पडत असल्याने चिपळूणला महापूर नवीन नाही. मात्र यावर्षीच्या २२ जुलैच्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकाराची नवी भीषण उंची गाठली.

चिपळूण, खेडमधील पूरग्रस्तांसाठी प्रशासनाचे मदत आणि बचावकार्य सुरू

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेडमधील पूरग्रस्तांसाठी प्रशासनाचे मदत आणि बचावकार्य सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. प्रामुख्याने चिपळूण शहराच्या विविध भागांमध्ये पाच हजाराहून अधिक लोक अडकून पडले आहेत.