राज्यातील सर्व पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज (१२ जून) बिनविरोध निवड झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राज्यातील सर्व पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज (१२ जून) बिनविरोध निवड झाली.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आठ कोटी ३२ लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. पतसंस्थेची भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) २८.७० टक्के असून, राज्यातील १५ हजार संस्थांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असेल. तसेच, सलग १७ वर्षे कर्जवसुलीचे प्रमाण ९९ टक्क्यांच्या वर राखण्यातही संस्था यशस्वी झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आज (३१ मार्च) संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी ताळेबंद मांडण्याचा आपला पायंडा पतसंस्थेने यंदाही कायम राखला.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने२० जून ते २० जुलै या ठेववृद्धी मासाच्या अखेरच्या दिवशी १ कोटी १६ लाखाच्या ठेवी जमा झाल्या असून पतसंस्थेकडील एकूण ठेवी ३२३ कोटीवर गेल्या आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.