कवितेतून प्रकट झाली अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता

तळवडे (ता. राजापूर) राजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता समीर देशपांडे या कवीने कवितेतून व्यक्त केली आणि कविसंमेलनात वाहव्वा मिळविली.

ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून ताकद : अरुण इंगवले

तळवडे (ता. राजापूर) : ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून मला माझी ताकद वाटते, असे प्रतिपादन चिपळूण येथील कवी अरुण इंगवले यांनी केले.

कोकणातील बंद घरांच्या चाव्या स्त्रियांच्याच हाती : श्रद्धा कळंबटे

तळवडे (ता. राजापूर) : महिलांनी स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय समाज बदलणार नाही. पुराणातल्या सावित्रीने पतीचे प्राण परत आणले, आधुनिक सावित्रीने शिक्षणाची दारे खुली केली. कोकणातील बंद दारांची समस्या सोडवण्याची शक्ती स्त्रियांच्या हाती आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी व्यक्त केले.

गावोगावी साहित्य संमेलने भरविणे आवश्यक – प्रकाश देशपांडे

तळवडे (ता. राजापूर) : गावोगावी भरणाऱ्या अशा संमेलनांमुळेच प्रांतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांना बळ मिळते. मराठी भाषेला समृद्ध करणार्‍या बोलीभाषा आणि ग्रामीण लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशा ग्रामीण संमेलनांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी केले.

मराठी आणि ग्रामीण बोलीभाषा जपण्याचा निर्धार करू या

तळवडे (ता. राजापूर) येथे राजापूर-लांजा नागरिक संघाने आयोजित केलेल्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांचे अध्यक्षीय भाषण.

आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात धीरज वाटेकर यांना ‘अक्षरमित्र’ पुरस्कार

तळवडे (ता. राजापूर) : चिपळूण येथील लेखक, पर्यटन, पर्यावरण, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ते धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर यांना राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचा ‘अक्षरमित्र’ पुरस्कार रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) प्रदान करण्यात येणार आहे.