ठाकरे सरकारची वर्षपूर्ती, मात्र जनतेची इच्छापूर्ती नाही – नारायण राणे

रत्नागिरी : राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्था, आपत्तीच्या काळातील नुकसाऩभरपाई अशा सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले असून करोनाच्या काळात तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सरकारने केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (३० नोव्हेंबर) रत्नागिरीत केली.

नारायण राणेंच्या लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये करोना तपासणी लॅबचे उद्घाटन

कुडाळ : पडवे (ता. कुडाळ) येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुरू केलेल्या लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मिळालेल्या निधीमधून आरटीपीसीआर (कोविड मोलेक्युलर लॅब) आज (नऊ ऑगस्ट) सुरू झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत पाच ऑगस्टपासून एसटीचे बुकिंग; प्रवासाचे नियम जाहीर

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता एसटीची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीत उद्यापासून (पाच ऑगस्टपासून) एसटीचे आरक्षण सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यातून येण्याचे, तसेच परतीच्या वाहतुकीचेसुद्धा आरक्षण उद्यापासून मिळणार आहे, असे रत्नागिरीच्या एसटी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.