महामार्ग, पाणी, विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने काम करण्याची नारायण राणेंची ग्वाही

‘महामार्ग, पिण्याचं पाणी, रत्नागिरी विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने मी काम करणार आहे. खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. लोकांना अपेक्षित असलेलं काम मी करू शकेन, असा मला विश्वास वाटतो. लोकांनी विश्वास ठेवला, तो मी सार्थकी लावीन. जवळपास ३९ वर्षांनी इथे भाजपचा खासदार निवडून आला आहे, याचा आनंद आहे. आता आम्ही त्यात सातत्य ठेवू,’ असं प्रतिपादन विद्यमान केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं.

लोकनिर्णय रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान आहे. त्या निमित्ताने मतदारसंघातल्या समस्या-अपेक्षा, रचना, वैशिष्ट्यं आणि राजकीय परिस्थिती अशा बाबींचा घेतलेला आढावा…

आंबा पिकासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ – अमित शहा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी श्री. शहा यांची आज (दि. ३ मे) दुपारी रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सभा झाली.

रत्नागिरीत लोकसभेसाठी अखेरच्या दिवशी नारायण राणेंसह सात अर्ज

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नारायण राणे यांच्यासह सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

रत्नागिरी लोकसभेची उमेदवारी नारायण राणे यांना जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांची उदासीनता

उद्योजक महोत्सवाच्या बाबतीतही तेच झाले. एवढा मोठा महोत्सव भरला. पण त्यावर झालेला प्रचंड खर्च लक्षात घेता त्या तुलनेमध्ये उद्योजकांनी महोत्सवात भाग घेतल्याचे दिसले नाही. रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यशाळांचे कामकाज सुरू होते. या योजना ज्यांच्यासाठी आहेत, त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचायला हवे होते. पण तसे झाल्याचे दिसले नाही. केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे घडले. केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री लोकाभिमुख प्रशासनासाठी कितीही कंठशोष करत असले तरी निर्ढावलेले अधिकारी-कर्मचारी स्वतःमध्ये कोणताही बदल घडवत नाहीत. लोकांशी त्यांना देणेघेणेच नसते, हेच यामधून पुन्हा एकदा समोर आले आहे.