संत परंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास – डॉ. प्रशांत परांजपे

दापोली : संतपरंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रशांत परांजपे यांनी केले.

खेडमधील चौकाला भारतरत्न पां. वा. काणे यांचे नाव देण्याची मागणी

खेड : मुरडे (ता. खेड) हे महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी त्यांचे नाव खेडमधील चौकाला देण्यात यावे, अशी मागणी महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीने केली आहे.

अधिक मासानिमित्ताने तेहतीस झाडे लावा – प्रशांत परांजपे

दापोली : अधिक मासानिमित्ताने तीस तीन म्हणजेच तेहतीस घरी जाऊन झाडाचे एक रोप देऊन तेथे वृक्ष वाढदिवस साजरा करा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत परांजपे यांनी केले.

पां. वा. काणेंच्या समग्र अभ्यासाची गरज : भिकुजी इदाते

दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या समग्र अभ्यासाची गरज आहे. त्यांच्या स्मारकाकरिता स्थापन झालेल्या समितीमुळे हे काम पुढे जाईल, असा विश्वास पद्मश्री भिकूजी ऊर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केला.

दापोलीत ८ मे रोजी भारतरत्न पां. वा. काणे स्मारकाचा पहिला वर्धापनदिन

दापोली : येथे स्थापन झालेल्या महामहोपाध्याय भारतरत्न पां. बा. काणे स्मारक समितीचा पहिला वर्धापनदिन येत्या ८ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विशेष गौरव समारंभही आयोजित करण्यात आला आहे.

शिमगोत्सवात कचरामुक्तीचा संकल्प करणारे आवाशी गाव

दापोली : शिमगोत्सवात लाकडे आणि कचरा जाळण्याचीच प्रथा असताना आवाशी (ता. दापोली) गावाने कचरामुक्तीचा संकल्प करून अनुकरणाचा आदर्श निर्माण केला आहे.