काळानुरूप बदल स्वीकारत लोककलांचे भवितव्य उज्ज्वल : डॉ. मुकुंद कुळे

चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.

‘लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा अनमोल ठेवा जपायला हवा’

चिपळूण : ‘स्त्री गीते हे उपमांचे भांडार आहे; विधी, श्रम अणि खेळ या अनुषंगाने स्त्री गीतांमध्ये नृत्यही येते. ही गीते इतिहास, समाज, नाती-गोती याची महती सांगणारी असून, लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा हा अनमोल ठेवा जपायला हवा,’ असा सूर ‘लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती’ या परिसंवादातून उमटला.

संपूर्ण कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण आवश्यक : माधव भांडारी

चिपळूण : मनोरंजनातून लोकप्रबोधन हा सर्वच लोककलांचा मूळ गाभा असल्यामुळे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे, तर डहाणूपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि ज्येष्ठ लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.

कोकणी खाद्यसंस्कृतीच्या परिसंवादाने चाळवली श्रोत्यांची भूक

कोकणाच्या खाद्यसंस्कृतीविषयीच्या चिपळुणातील एका परिसंवादाने श्रोत्यांची भूकच चाळवली. कोकणी संस्कृतीतील विविध शाकाहारी, मत्स्याहारी मांसाहारी पदार्थांविषयीची सविस्तर चर्चा या परिसंवादात झाली.

कोकणी लोककलांसाठी महामंडळ स्थापण्याबद्दल सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री शिंदे

‘कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळे लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रीतीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चिपळूणच्या लोककला महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार

चिपळूण : चिपळूण येथील श्री जुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेबुवारी दरम्यान पर्यटन, लोककला, सास्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.