निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांची उदासीनता

उद्योजक महोत्सवाच्या बाबतीतही तेच झाले. एवढा मोठा महोत्सव भरला. पण त्यावर झालेला प्रचंड खर्च लक्षात घेता त्या तुलनेमध्ये उद्योजकांनी महोत्सवात भाग घेतल्याचे दिसले नाही. रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यशाळांचे कामकाज सुरू होते. या योजना ज्यांच्यासाठी आहेत, त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचायला हवे होते. पण तसे झाल्याचे दिसले नाही. केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे घडले. केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री लोकाभिमुख प्रशासनासाठी कितीही कंठशोष करत असले तरी निर्ढावलेले अधिकारी-कर्मचारी स्वतःमध्ये कोणताही बदल घडवत नाहीत. लोकांशी त्यांना देणेघेणेच नसते, हेच यामधून पुन्हा एकदा समोर आले आहे.

खेडशी गावाने नववर्षदिनी केले विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, एक जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले.

विकसित भारत संकल्प यात्रेचे रत्नागिरी शहरात उत्साहात स्वागत

विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.

महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही

विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (९ डिसेंबर) देशभरातल्या विविध ठिकाणच्या नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशभरात फिरणार आहे.