महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, भारताचा वैभवशाली इतिहास : धनंजय चितळे

‘महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, तर भारताचा वैभवशाली इतिहास आहे. नीतिमूल्यांपासून मनुष्यस्वभावापर्यंत, युद्धतंत्रापासून व्यवस्थापन कौशल्यापर्यंत आणि अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत सर्वच गोष्टींचे धडे आपल्याला यातून मिळतात. त्यामुळे हे धडे घेण्यासाठी मूळ महाभारताचे बारकाईने वाचन आणि त्यावर चिंतन आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांनी केले.

रत्नागिरीत २०-२१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” व्याख्यानमाला

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २० आणि २१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दोन्ही पुष्पे प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे गुंफणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात घुमतोय ‘होलिओ’चा गजर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. सणातील शेवटचा दहावा होम मंगळवारी (दि. ७ मार्च) रोजी पेटवला जाणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ३१५ सार्वजनिक आणि २ हजार ८५४ खासगी होळ्यांचा शेवट उद्या होईल.

पाश्चात्य विद्वानांना गीता अर्थासह पाठ; आपल्याकडे मात्र उपेक्षा : धनंजय चितळे

‘झोंपाळ्यावरची गीता’ या मराठी ओवीरूप पुस्तकाच्या राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे गीता जयंतीच्या औचित्याने तीन डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरीत प्रकाशन झाले. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, व्याख्याते-प्रवचनकार धनंजय चितळे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गीता जयंतीदिनी ‘झोंपाळ्यावरची गीता’च्या इंग्रजी अनुवादाचे रत्नागिरीत प्रकाशन; कोकण मीडियाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरणही होणार

रत्नागिरी : येत्या शनिवारी, तीन डिसेंबर २०२२ रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीत The Geeta in Leisure या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन होणार आहे. १९१७ साली कवी अनंततनय यांनी लिहिलेल्या ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केला आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. तसेच, साप्ताहिक कोकण मीडियाने २०२२च्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर घेतलेल्या लेख आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही या वेळी होणार आहे.

वाटूळचा शिमगोत्सव

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या वाटूळ या गावातला शिमगोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. या शिमगोत्सवाबद्दल विराज विलास चव्हाण यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.