रत्नागिरी कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे ‘श्रावणधारा’

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्रावणधारा’ या स्वरचित काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एक तरी पुस्तक लिहावे

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निष्क्रियतेबाबत यापूर्वी या सदरात यापूर्वी अनेक वेळा मुद्दे मांडले होते. यावेळी मात्र एक सकारात्मक मुद्दा मांडण्याची संधी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेने दिली आहे. गेली काही वर्षे सूप्तावस्थेत असलेल्या या शाखेचे अलीकडेच पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. शाखेतर्फे विविध संकल्प जाहीर करण्यात आले आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प त्यामध्ये आहे.

कवितेमध्ये आशय आणि अभिव्यक्तीला महत्त्व : जयश्री बर्वे

रत्नागिरी : कवितेमध्ये आशयाइतकेच आणि अभिव्यक्तीला महत्त्व असते. ते दोन्ही परस्परपूरक आहेत. आशयाबरोबरच भाषा, शब्द आणि कल्पनासौंदर्य महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापिका सौ. जयश्री बर्वे यांनी आज येथे केले.