मातृप्रेरणा आणि कुसुम हस्तलिखिताचे थाटात प्रकाशन

रत्नागिरी : येथील राष्ट्र सेविका समितीचे रत्नकोंदण तसेच रेणुका प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक वार्तापत्र पाक्षिकाचा मातृप्रेरणा विशेषांक आणि कुसुम हस्तलिखिताचे प्रकाशन दिमाखदारपणे पार पडले.

रत्नागिरीतील शास्त्रज्ञाचे हिंदी पुस्तक करणार देशभरातील मत्स्य उत्पादकांना मार्गदर्शन

रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी यांनी आतापर्यंत असंख्य मत्स्योत्पादकांना मार्गदर्शन केले असून, त्यासाठी पुस्तकेही लिहिली आहेत. आता त्यांनी ‘मीठे जल में मछलीपालन’ हे समग्र माहिती देणारे हिंदी पुस्तक लिहिले असून, त्याचा उपयोग देशभरातील मत्स्योत्पादकांना होणार आहे.

रत्नागिरी : राष्ट्रसेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानचे वैचारिक मंथन

रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने वैचारिक मंथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

वृद्धाश्रमांची वाढणारी संख्या म्हणजे संस्कृतीला खिंडार? – सुनेत्रा जोशी

रत्नागिरी : खरे तर भारतीय संस्कृती ही नात्यांची वीण घट्ट करणारी आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या बघता आपल्या या संस्कृतीला कुठेतरी खिंडार पडले आहे का, अशी शंका येत असल्याची भीती लेखिका सौ. सुनेत्रा जोशी यांनी व्यक्त केली.

‘डॉ. विजय जोशींचे पुस्तक मत्स्यशेतीची ग्रामगीता ठरेल’

रत्नागिरी : रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. विजय पांडुरंग जोशी यांनी लिहिलेल्या शेततळ्यातील आणि तलावातील मत्स्यशेती – तंत्र आणि मंत्र या पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाइन पद्धतीने रत्नागिरीत झाले. हे पुस्तक म्हणजे मत्स्यशेतीची ग्रामगीता ठरेल, अशा शब्दांत मान्यवरांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पुस्तकाची महती सांगितली.